10,99 €
inkl. MwSt.

Versandfertig in über 4 Wochen
  • Broschiertes Buch

About the Book: उगवत्या सुर्यासह नव्या सामर्थ्याने उगवावे आणि मावळत्या सुर्यासह जुने अनुभव रुजवावे अभ्यासाला अनेक पर्याय परंतु सर्वात संदर मार्ग हाती लागतो अनुभव अभ्यासल्याने. प्रत्येकाच्या आयुष्यात निम्म्याहुन अधिक प्रसंग सारखेच, मात्र त्याचे स्वरूप निराळे. आयुष्यातील साध्या-साध्या गोष्टीला दुर्लक्षित करुन, वेगळे काहीच्या नादात, साधसरळ आयुष्यातील वेगळच करून बसतो. दोरीला जेवढं गुंतवलं तेवढी ती गुंतत जाते आणि गुंतलेल्या दोरीचा उपयोग जरा कमीच. म्हणुन दोरीला म्हणजे आयुष्याला साध्या सरळ गोष्टीत गुंतवण्यापेक्षा, आहे तशी मोकळी ठेवली तर अधिक उपयोगाची आहे. हातातून वाळू जशी निसटत जाते तसंच आयुष्य बघता-…mehr

Produktbeschreibung
About the Book: उगवत्या सुर्यासह नव्या सामर्थ्याने उगवावे आणि मावळत्या सुर्यासह जुने अनुभव रुजवावे अभ्यासाला अनेक पर्याय परंतु सर्वात संदर मार्ग हाती लागतो अनुभव अभ्यासल्याने. प्रत्येकाच्या आयुष्यात निम्म्याहुन अधिक प्रसंग सारखेच, मात्र त्याचे स्वरूप निराळे. आयुष्यातील साध्या-साध्या गोष्टीला दुर्लक्षित करुन, वेगळे काहीच्या नादात, साधसरळ आयुष्यातील वेगळच करून बसतो. दोरीला जेवढं गुंतवलं तेवढी ती गुंतत जाते आणि गुंतलेल्या दोरीचा उपयोग जरा कमीच. म्हणुन दोरीला म्हणजे आयुष्याला साध्या सरळ गोष्टीत गुंतवण्यापेक्षा, आहे तशी मोकळी ठेवली तर अधिक उपयोगाची आहे. हातातून वाळू जशी निसटत जाते तसंच आयुष्य बघता- बघता निघून चाललय आणि आपण आयुष्यच्या नको असलेल्या गुंत्यात गुंतुन बसलो... शोधत अशा प्रश्नांचे उत्तर, ज्यांचे उत्तर अनुभवाने आधीच दिलयं. समोर उपस्थित असलेला अंश-आणि अंश काही तरी सांगत असतो, प्रत्येक अनुभव नवे ते शिकवत असतो आणि आपण मात्र आपले इंद्रिय बंद करुन निष्फळ व्यथेत विलीन असतो. उगवत्या सुर्याची ओढ साऱ्यांनाच असते, खेरीज कधी 'अस्त' होत असलेल्या सुर्याकडे डोकावून बघा नक्कीच ती उगवत्या सुर्यापेक्षा प्रेरणादायी असेल. शेवटी काय ? तर ...... 'अस्त अनुभवावे, कारण..... अनुभव बोलतो'...
Autorenporträt
About the Author: डॉ संपदा घाटबांधे, वय वर्ष 23, जन्म महाराष्ट्रातील केशोरी या छोट्याशा गावी झाला.गाव जरी छोटा असला तरी स्वप्न मात्र मोठे आहे. जग बघणं आणि पुस्तक वाचणं या दोन्ही गोष्टीत जरा साम्य आणि या दोन्ही गोष्टीमध्ये अत्याधिक रुची ठेवणारी संपदा! आजवर अनेक पुस्तके वाचली आणि त्यामधुनच लेखनाची आवड निर्माण झाली. मुळात अव्यक्त स्वभावाची असल्यामुळे मनातील भावना शब्दांत रेखाटण्याची सवय झाली आणि हळुहळु लेखनाच्या समुद्रात वाहत गेली. तसा लेखनाचा फारसा अनुभव नाही, मात्र 'प्रयत्नार्थी परमेश्वर' मानत पुस्तक लिहण्याचा हा पहिलाच प्रयत्न. तसे अनेक साहित्य संग्रहात लेख प्रकाशित आहेत. कारकिर्द बाबतीत सांगायचे झाल्यास,बी..ए.एम.एस चं शेवटचं वर्ष अभ्यासत आहे. स्वप्न हे डॉक्टर बनण्याचं परंतु लेखन आणि वाचन हे छंद! लेखनातून जरी आनंद मिळत असला तरी इतरांना त्यातून प्रेरणा मिळाल्यास जास्त समाधान मानून घेणारी लेखिका 'जे शब्द समोरा-समोर व्यक्त होत नाही ते लेखनात व्यक्त होतात' हा मूलमंत्रजोपासून कार्यरत राहण्याचा हा प्रयत्न..