दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... ज्ञान प्राप्त झाल्यावर भक्तियुक्त अंत:करणानं योग्यानं लोकसंग्रहार्थ कर्मं केलीच पाहिजेत. कर्मयोगी ही श्रेष्ठतम् अवस्था असते. परमेश्वरासाठी नियत कर्मं करीत राहणं यातच खरा पुरुषार्थ असतो. म्हणून तू योगस्थ राहून युद्धाचं हे कर्म नि:शंक मनानं कर असं भगवंत अर्जुनाला सांगतात. जो श्रद्धेनं अंत:करणपूर्वक परमेश्वराला भजतो आणि आत्मसिद्धी प्राप्त झाल्यानंतरही केवळ त्याच्यासाठीच कर्मं करतो तो योगी सर्वश्रेष्ठ समजला जातो.
Dieser Download kann aus rechtlichen Gründen nur mit Rechnungsadresse in A, D ausgeliefert werden.